Ad will apear here
Next
दहावीचा निकाल सहा जूनला नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०१९मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सहा जून रोजी जाहीर होणार असल्याचे वृत्त प्रसृत झाले होते; मात्र ते खरे नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. 

‘दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र ती लवकरच जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी, पालकांनी, तसेच शिक्षकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

आतापर्यंत दहावीच्या निकालाच्या अनेक तारखांबद्दलचे मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरत होते. त्यातच, सहा जून रोजी निकाल लागण्याची शक्यता असल्याचे वृत्त काही संकेतस्थळांनी दिले; मात्र निकालाची तारीख जाहीर झाल्याचे समजून अनेकांनी ते वृत्त फॉरवर्ड केले. त्यामुळे सर्वांचाच गोंधळ उडाला होता.  

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZWMCB
Similar Posts
दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ऑनलाइन निकाल आठ जूनला पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आठ जून २०१९ रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजल्यानंतर mahresult.nic.in या वेबसाइटवर हा निकाल उपलब्ध होणार आहे. मंडळाकडून याबाबतची अधिकृत घोषणा सात जून रोजी करण्यात आली
दहावीतही मुलींचीच बाजी आणि कोकण विभागच अव्वल पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून, ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आज (आठ जून) दुपारी एक वाजता mahresult.nic.in या संकेतस्थळासह अन्य काही संकेतस्थळांवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
बारावीच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग सलग आठव्या वर्षी अव्वल पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ८५.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल २.५३ टक्क्यांनी घसरला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा ७
‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात होती. या परीक्षेसाठी येथील श्रीमान गंगाधर गोविंद इंग्लिश मीडियम स्कूलमधून (जीजीपीएस) १७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language